कलम ३७० रहित केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे २३ नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या !

केंद्रात भाजपची सत्ता असतांना जम्मू-काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वपक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे अपेक्षित नाहीत. काश्मीरमधील स्थिती पालटण्यासाठी अधिक कठोर निर्णय आणि कृती करणे आवश्यक ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – कलम ३७० रहित केल्यानंतर गेल्या २ वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत भाजपचे २३ नेते आणि कार्यकर्ते यांची जिहादी आतंकवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. भाजपच्या प्रवक्त्यांंच्या म्हणण्यानुसार एकट्या कुलगाम जिल्ह्यात गेल्या वर्षभरात भाजप ७ नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.