
पंढरपूर, १८ ऑगस्ट – जेवढी गर्दी मद्यालये आणि ‘मॉल’मध्ये होते, त्यापेक्षा अल्प गर्दी मंदिरांत होते. हार-फुले विक्रेत्यांपासून ते मंदिरातील पुजार्यांपर्यंत अशा अनेक गरीब आणि गरजू लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरे उघडणे आवश्यक आहे. सामाजिक अंतराचा नियम पाळून मंदिर उघडण्यास काय हरकत आहे ? असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. माजी आमदार सुधारपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस पंढरपूर येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून राज्यात दळणवळण बंदी सदृश्य परिस्थिती आहे. आता काही प्रमाणात दळणवळण बंदी शिथील करण्यात आली आहे. अन्य अनेक गोष्टी सरकारने चालू केल्या असून केवळ धार्मिक स्थळे आणि मंदिरे बंद ठेवली आहेत. एकीकडे सरकार मद्यालये चालू करते, तर दुसरीकडे मंदिरे बंद ठेवते. मंदिरे बंद ठेवणे ही सरकारची चूक आहे.’’
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !