किरकोळ कारणावरून मुलानेच केली आईची हत्या !

व्यक्तीमधील संयम अल्प होत चालल्याचे उदाहरण ! प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अशा घटनांमधून लक्षात येते.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सातारा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर बसस्थानक परिसरामध्ये पहाटे शहाजी पवार यांनी धारधार शस्त्राने आई सुलाबाई पवार यांची हत्या केली. किरकोळ कारणावरून मुलगा आणि आई यांच्यात वाद झाले होते. त्यातून रागाच्या भरात शहाजी यांनी आईची हत्या केली. नंतर शहाजी हे स्वत: रहिमतपूर पोलीस ठाण्यात उपस्थित झाले आणि हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी शहाजी यांना कह्यात घेतले असून पुढील अन्वेषण चालू आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक गणेश किद्रे यांनी दिली.