
भिलवडी (जिल्हा सांगली), २९ जुलै (वार्ता.) – वर्ष २०१९ मध्ये आमचे सरकार असतांना आम्ही निकषापलीकडे जाऊन साहाय्य केले. वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदाची हानी अधिक आहे. सर्वसामान्य माणसांपासून शेतकर्यांची अतोनात हानी झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक हानीभरपाई मिळण्यासाठी संघर्ष करू, अशी चेतावणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भिलवडी येथे पूरग्रस्तांशी संवाद साधल्यावर त्यांनी ही चेतावणी दिली.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘कृष्णाकाठच्या गावांना होणारा पुराचा धोका कायमचा संपवायचा असेल, तर ‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण’ योजना पूर्ण करण्याविना पर्याय नाही, तसेच वडणेरे समितीच्या शिफारसींची सरकारने कार्यवाही करावी.’’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !