
भिलवडी (जिल्हा सांगली), २९ जुलै (वार्ता.) – वर्ष २०१९ मध्ये आमचे सरकार असतांना आम्ही निकषापलीकडे जाऊन साहाय्य केले. वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदाची हानी अधिक आहे. सर्वसामान्य माणसांपासून शेतकर्यांची अतोनात हानी झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक हानीभरपाई मिळण्यासाठी संघर्ष करू, अशी चेतावणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भिलवडी येथे पूरग्रस्तांशी संवाद साधल्यावर त्यांनी ही चेतावणी दिली.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘कृष्णाकाठच्या गावांना होणारा पुराचा धोका कायमचा संपवायचा असेल, तर ‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण’ योजना पूर्ण करण्याविना पर्याय नाही, तसेच वडणेरे समितीच्या शिफारसींची सरकारने कार्यवाही करावी.’’
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक