योजनेच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न देणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. आपत्काळामध्ये पाण्याचा असा अपव्यय होण्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना काढणे आवश्यक !

बारामती – कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सिद्ध करण्यात आलेली शिरसाई उपसा सिंचन योजनेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. शिर्सुफळ गावातील म्हात्रे वस्तीतील अनेक घरात आणि शेतात पाणी शिरले. गेल्या अनेक वर्षांपासून योजनेच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सौजन्य : News18 Lokmat
वाहिनीच्या आतील भागात वर्ष २०१७ मध्ये रंगकाम करण्यासाठी शिर्सुफळ येथे वाहिनीला छेद दिला होता. याच ठिकाणी गंज लागुन वाहिनी फुटली. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून प्रशासन काम करत असल्याचे शिरसाई उपसा सिंचन योजनेचे उपअभियंता रंगनाथ भुजबळ यांनी सांगितले.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !