
सातारा, २ जून (वार्ता.) – जिल्ह्यात कडक दळणवळण बंदी असल्याने कोरोना बाधितांचा दर अल्प झाला आहे. बाधित दर अजून अल्प करण्यासाठी विविध उपाययोजना राबवून कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाविषयक उपाययोजनांचा आढावा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले, ‘‘लसीकरणासाठी नागरिकांना टोकन दिल्यानंतर केवळ सकाळी ९ ते ११ या वेळेतच लसीकरण करावे. तसेच जो बाधित झाला आहे, त्याच्या संपर्कात जे जे आले आहेत त्यांचा शोध घेण्यात यावा. तिसर्या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने आतापासूनच सिद्धता करावी. त्यासाठी स्वतंत्र इमारती आतापासूनच कह्यात घ्याव्यात.’’
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !