|

ठाणे, ३१ मे (वार्ता.) – लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकामध्ये ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या आई सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळींना ठार केले’, असे कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक पुरावा नसलेले खोटे लिखाण केले आहे. कुबेर यांनी समाज-जाती यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी या पुस्तकावर बंदी घालून गिरीश कुबेर आणि पुस्तकाचे प्रकाशक यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा, अशी मागणी अंबरनाथ आणि बदलापूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या युवा विभागाने तहसीलदारांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या युवा विभागाचे अंबरनाथ आणि बदलापूरचे कार्यकर्ते नरेश चव्हाण, विकी चव्हाण, अमित जमदाडे, सिद्धी साळवी, अमित पाटील, प्रथमेश मुदलियार आदी उपस्थित होते.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !