
पुणे – गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या त्यांच्या पुस्तकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्या विरोधात राज्यात हिंदुत्वनिष्ठांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर २५ मे या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने येथील जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख संजय जढर आणि कार्यकर्ते यांनी निवेदन दिले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणारे पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर ताबडतोब बंदी घालावी, तसेच महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणारे समाजद्रोही लेखक गिरीष कुबेर यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
महामंडळाच्या बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम !