
सातारा, २६ मे (वार्ता.) – सद्यस्थितीमध्ये समाजाने आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत रहाण्याची आवश्यकता आहे. कोरोनाकाळात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या विचारांचे अनुसरण केले पाहिजे. गीता वाचन हा मन:शांतीसाठी सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे गीता ग्रंथाचे वाचन सर्वांनी करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते हरिदत्त जाधव यांनी केले.
खटाव तालुक्यातील निढळ या गावी नुकताच अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. या निमित्ताने कोरोनाचे नियम पाळत निढळ गावचे सुपुत्र हरिदत्त सुभाष जाधव यांनी ५० भाविकांना भगवद्गीता ग्रंथ भेट दिला. हरिदत्त जाधव हे पुणे येथील इन्फोसिस आस्थापनामध्ये उच्चपदस्थ आहेत. विज्ञानाला अध्यात्माची जोड देऊन जीवन जगणार्या आणि इतरांनाही प्रोत्साहन देणार्या हरिदत्त जाधव यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !