
सोलापूर – सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या स्रोतांपैकी एक असलेल्या औज बंधारा कोरडा पडला असून टाकळी बंधार्यात सध्या सोलापूर शहराला पुढील १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शेष आहे. भीमा नदीही कोरडी पडल्याने पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या शहरांसह नदी काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे उजनी धरणातून २० मे या दिवशी भीमा नदीत ३ सहस्र क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत ८ सहस्र क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे.
औज बंधारा परिसरातील भीमा नदीतील टाकळी जॅकवेलजवळ सध्या केवळ ९ फूट पाणी असून, हे पाणी केवळ एक आठवडाभर सोलापूरकरांना पुरेल. उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधार्यात येण्यासाठी अनुमाने १० ते १२ दिवस लागणार आहेत.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस