
सोलापूर – सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या स्रोतांपैकी एक असलेल्या औज बंधारा कोरडा पडला असून टाकळी बंधार्यात सध्या सोलापूर शहराला पुढील १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शेष आहे. भीमा नदीही कोरडी पडल्याने पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या शहरांसह नदी काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे उजनी धरणातून २० मे या दिवशी भीमा नदीत ३ सहस्र क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत ८ सहस्र क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे.
औज बंधारा परिसरातील भीमा नदीतील टाकळी जॅकवेलजवळ सध्या केवळ ९ फूट पाणी असून, हे पाणी केवळ एक आठवडाभर सोलापूरकरांना पुरेल. उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधार्यात येण्यासाठी अनुमाने १० ते १२ दिवस लागणार आहेत.
महाबळेश्वर येथील हनुमान मंदिराचा मार्ग ‘द क्लब’ व्यवस्थापनाकडून खुला
गोव्यात पुढील १५ दिवस पाऊस न पडल्यास १ जुलैपासून पाण्याच्या वापरावर मर्यादा ! – सुभाष फळदेसाई, पाणीपुरवठामंत्री
वृत्तपत्राच्या कागदावरून वडापाव विकणार्या २६ दुकानांवर मुंबईत कारवाई !
हिंजवडी (पुणे) येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
ठाणे येथे सीरवी समाजाच्या कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती
‘आकाशवाणी पुणे’ विभागातील वृत्त विभाग बंद होणार ?