
कोल्हापूर, ३ फेब्रुवारी – उंचगाव हे करवीर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असून गावात येणारा उंचगाव कमानीपासूनचा प्रमुख मार्ग असलेल्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात. या रस्त्यावरील खड्डे चुकवण्यात वाहनधारकांचे अपघातही झालेले आहेत. उंचगावची मंगेश्वर देवाची त्रैवार्षिक यात्रा ही २ मासांवर आली आहे. या काळात उंचगावमध्ये प्रचंड गर्दी होत असते. तरी उंचगाव स्वागत कमान ते आंबेडकर चौक रस्ता तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील अभियंता विजय कांडगावे यांना देण्यात आले. हे डांबकरीकरण लवकरात लवकर न झाल्यास आंदोलनाची चेतावणी याप्रसंगी करवीरतालुका प्रमुख श्री. राजू यादव यांनी दिली आहे.
या वेळी सर्वश्री दीपक पाटील, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, कैलास जाधव, योगेश लोहार, भूषण चौगुले, नितीन गाणबोटे आदी उपस्थित होते.
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मिडिया हब’ उभारणार !
आंबिवली (कल्याण) येथील इराणी लोकांकडून बसवर दगडफेक; प्रवासी घायाळ
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !