
कोल्हापूर, ३ फेब्रुवारी – उंचगाव हे करवीर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असून गावात येणारा उंचगाव कमानीपासूनचा प्रमुख मार्ग असलेल्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात. या रस्त्यावरील खड्डे चुकवण्यात वाहनधारकांचे अपघातही झालेले आहेत. उंचगावची मंगेश्वर देवाची त्रैवार्षिक यात्रा ही २ मासांवर आली आहे. या काळात उंचगावमध्ये प्रचंड गर्दी होत असते. तरी उंचगाव स्वागत कमान ते आंबेडकर चौक रस्ता तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील अभियंता विजय कांडगावे यांना देण्यात आले. हे डांबकरीकरण लवकरात लवकर न झाल्यास आंदोलनाची चेतावणी याप्रसंगी करवीरतालुका प्रमुख श्री. राजू यादव यांनी दिली आहे.
या वेळी सर्वश्री दीपक पाटील, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, कैलास जाधव, योगेश लोहार, भूषण चौगुले, नितीन गाणबोटे आदी उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन