उंचगाव कमान ते आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा ! – करवीर शिवसेना

करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील अभियंता विजय कांडगावे यांना निवेदन देण्यात आले

कोल्हापूर, ३ फेब्रुवारी – उंचगाव हे करवीर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असून  गावात येणारा उंचगाव कमानीपासूनचा प्रमुख मार्ग असलेल्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात. या रस्त्यावरील खड्डे चुकवण्यात वाहनधारकांचे अपघातही झालेले आहेत. उंचगावची मंगेश्‍वर देवाची त्रैवार्षिक यात्रा ही २ मासांवर आली आहे. या काळात उंचगावमध्ये प्रचंड गर्दी होत असते. तरी उंचगाव स्वागत कमान ते आंबेडकर चौक रस्ता तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील अभियंता विजय कांडगावे यांना देण्यात आले. हे डांबकरीकरण लवकरात लवकर न झाल्यास आंदोलनाची चेतावणी याप्रसंगी करवीरतालुका प्रमुख श्री. राजू यादव यांनी दिली आहे.

या वेळी सर्वश्री दीपक पाटील, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, कैलास जाधव, योगेश लोहार, भूषण चौगुले, नितीन गाणबोटे आदी उपस्थित होते.