आगीत महत्त्वाच्या साहित्यांसह १ सहस्र कोटींहून अधिक हानी

पुणे – सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीविषयी चौकशी केली जात आहे. त्यानंतरच हा अपघात होता कि घातपात हे स्पष्ट होईल. त्याआधी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य रहाणार नाही, असे नमूद करतांनाच ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे, त्यांचे पूर्ण दायित्व आस्थापनाने घेतले आहे. त्या व्यतिरिक्त आणखी काही करण्याची आवश्यकता असेल, तर सरकार निश्चित करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी सीरमला भेट दिली. त्या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावालासुद्धा उपस्थित होते. आगीत १ सहस्र कोटींहून अधिक हानी झाल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. तसेच बीसीजीसह इतर औषधांच्या साठ्यावर परिणाम झाला असून महत्त्वाच्या साहित्याची हानी झाली आहे, असे पुनावाला यांनी सांगितले.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !