दारूबंदी असलेल्या भागांत अशा प्रकारच्या घटना होणे हे कायद्याच्या पालनासाठी ज्यांनी जागरूक रहाणे प्रशासनाला जमत नसल्याचेच द्योतक आहे !

गडचिरोली – येथील ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान उमेदवाराने विषारी दारू पाजल्याने दोघांचा मृत्यू, तर ५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे २० जानेवारी या दिवशी घडली. बाधा झालेल्या ३ जणांना चंद्रपूरच्या रुग्णालयात, तर एकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. (समाजाला नशेच्या आहारी पाडणार्यांना कडक शिक्षा करायला हवी. – संपादक)
गडचिरोली जिल्ह्यात १९९२ या वर्षापासून मद्यबंदी आहे. मद्यबंदी यशस्वी व्हावी, यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून प्रयत्न चालू आहेत, तसेच जिल्ह्यात मुक्तीपथ संघटनेकडून मद्यबंदीच्या कार्यवाहीसाठी जनजागृती करण्यात येते; मात्र त्यानंतरही जिल्ह्यात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध आणि बनावट मद्याचा पुरवठा होत असल्याचे या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही