
पणजी, १५ जानेवारी (वार्ता.) – १ लाख ४० सहस्र वीजदेयक थकबाकीदारांमधील अल्प थकबाकीदारांनी वीज खात्याच्या ‘वन टाईम् सेटलमेंट’ (ओ.टी.एस्.) योजनेचा लाभ घेतला आहे. नोटिसीचा कालावधी संपल्यानंतर सर्व थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्यात येणार आहे, अशी चेतावणी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली आहे.
वीज खात्याने १ डिसेंबर २०२० पासून वीज थकबाकीदारांसाठी ‘ओ.टी.एस्.’ योजना लागू केली आहे. या अंतर्गत उशिरा देयक भरल्याने भरावा लागणारा दंड आकारण्यात येत नाही. ही योजना आता ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. वीजमंत्री काब्राल पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील सुमारे ७ लाख वीजजोडणी धारकांमधील १ लाख ४० सहस्त्र वीजजोडणीधारक वेळच्या वेळी वीजदेयक भरत नाहीत.’’
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचे कौतुक
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे