
पणजी, ७ जानेवारी (वार्ता.) – भारतीय जनता पक्षातील मंत्री आणि आमदार आपापसांत भांडत आहेत. शेळ-मेळावली आयआयटी प्रकल्प याचे ज्वलंत उदाहरण आहे. या प्रकल्पात काहीही अडचण नाही, तर हे निवळ राजकारण आहे. लोकांना चिथावायचे आणि आपली पोळी शेकून घ्यायची, असा प्रयत्न चालू आहे. हा प्रकल्प आणि येथील समस्या या संदर्भातील सत्य बाहेर येण्यासाठी सरकारने निष्पक्ष स्वतंत्र आयोग नेमावा, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी येथील पत्रकार परिषदेत केली.
शेळ-मेळावली येथे मुळात समस्याच नाही. सोडवायचाच असल्यास चुटकीसरशी सुटणारा हा प्रश्न आहे; मात्र राजकारण करण्यासाठी या प्रश्नाचे भांडवल करण्यात येत असल्याचा आरोप श्री. फळदेसाई यांनी केला. २ राजकारण्यांमधील वादामुळे हे प्रकरण वाढले आहे. राजकीय नेत्यांनी लोकांच्या प्रश्नांऐवजी स्वार्थास महत्त्व दिल्याने हा प्रश्न चिघळला आहे. राजकारण्यांचा वरदहस्त लाभल्यामुळे हे प्रकरण हाताबाहेर जाण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी गोमंतकीय जनता संभ्रमात पडली आहे. जनतेला सत्य जाणून घेण्याचा अधिकार असल्याने यावर एक स्वतंत्र आयोग नेमावा, अशी मागणी श्री. फळदेसाई यांनी केली.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री