मूळचे रत्नागिरीतील असलेल्या ३४ खलाशांवर प्रशासनाकडून गुन्हे नोंद

रत्नागिरी – दळणवळण बंदी असतांनाही उरण बंदरातून रत्नागिरी येथे समुद्रामार्गे प्रवास करणार्या ३४ खलाशांवर प्रशासनाकडून गुन्हे नोंद करण्यात आलेत. हे ३४ खलाशी मूळचे रत्नागिरीतील आहेत.
उरण बंदरात रहाणारे खलाशी यांना सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदी असल्यामुळे त्यांना मूळ गावी परतायला कुठलेही वाहन उपलब्ध नव्हते; म्हणून या ३४ खलाशांनी मुंबई आणि उरणहून बोटीने रत्नागिरीपर्यंत प्रवास केला होता. रत्नागिरीतही जिल्हाबंदी असल्यामुळे ही घटना प्रशासनाच्या लक्षात आल्यावर सर्व खलाशांवर नियमभंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या ३४ खलाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !