मूळचे रत्नागिरीतील असलेल्या ३४ खलाशांवर प्रशासनाकडून गुन्हे नोंद

रत्नागिरी – दळणवळण बंदी असतांनाही उरण बंदरातून रत्नागिरी येथे समुद्रामार्गे प्रवास करणार्या ३४ खलाशांवर प्रशासनाकडून गुन्हे नोंद करण्यात आलेत. हे ३४ खलाशी मूळचे रत्नागिरीतील आहेत.
उरण बंदरात रहाणारे खलाशी यांना सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदी असल्यामुळे त्यांना मूळ गावी परतायला कुठलेही वाहन उपलब्ध नव्हते; म्हणून या ३४ खलाशांनी मुंबई आणि उरणहून बोटीने रत्नागिरीपर्यंत प्रवास केला होता. रत्नागिरीतही जिल्हाबंदी असल्यामुळे ही घटना प्रशासनाच्या लक्षात आल्यावर सर्व खलाशांवर नियमभंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या ३४ खलाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.
मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !