मूळचे रत्नागिरीतील असलेल्या ३४ खलाशांवर प्रशासनाकडून गुन्हे नोंद

रत्नागिरी – दळणवळण बंदी असतांनाही उरण बंदरातून रत्नागिरी येथे समुद्रामार्गे प्रवास करणार्या ३४ खलाशांवर प्रशासनाकडून गुन्हे नोंद करण्यात आलेत. हे ३४ खलाशी मूळचे रत्नागिरीतील आहेत.
उरण बंदरात रहाणारे खलाशी यांना सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदी असल्यामुळे त्यांना मूळ गावी परतायला कुठलेही वाहन उपलब्ध नव्हते; म्हणून या ३४ खलाशांनी मुंबई आणि उरणहून बोटीने रत्नागिरीपर्यंत प्रवास केला होता. रत्नागिरीतही जिल्हाबंदी असल्यामुळे ही घटना प्रशासनाच्या लक्षात आल्यावर सर्व खलाशांवर नियमभंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या ३४ खलाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !