
कालगाव (कराड) – मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्यांची विद्यार्थीसंख्या वाढली पाहिजे आणि ग्रामीण भागांतील मातृभाषेतील शिक्षणाला बळ मिळाले पाहिजे. या उदात्त हेतूने मराठी शाळेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी रहित करण्याचा धोरणात्मक निर्णय कालगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये सरपंच सोमनाथ चव्हाण आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एकमताने हा ठराव संमत केला आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे मराठी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढेल, तसेच दिवसेंदिवस अल्प होत चाललेली विद्यार्थीसंख्या वाढण्यास साहाय्य होईल.
सध्या इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या आकर्षणामुळे अनेक मराठी शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षण वाचवण्यासाठी ग्रामपंचायतीने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. कालगाव ग्रामपंचायतीचा हा निर्णय दूरदृष्टी पूर्ण आणि प्रेरणादायी असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : (१८.०६.२०२६)
अधिकमासात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला ९.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न
सिंहस्थ कुंभपर्वासाठी बोधचिन्ह स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याविषयी सुमित काटे यांचा सत्कार
खोट्या स्वाक्षर्या करून देयके संमत केल्याच्या प्रकरणी ५ ठेकेदारांवर गुन्हा नोंद
गोव्यात ३० जूनपासून वाहतुकीचे नियम मोडल्यास भ्रमणभाषवर दंडात्मक कारवाईचे ‘चलन’ येणार
संमत वीजभार आणि विजेचा प्रत्यक्ष वापर यांच्या अभ्यासाचे निर्देश