‘देवस्थान इनाम भूमी खालसा करा !’ – अखिल भारतीय किसान सभा

अखिल भारतीय किसान सभे’ची निदर्शनांद्वारे मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ‘अखिल भारतीय किसान सभे’च्या वतीने आंदोलन

सांगली – येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ‘अखिल भारतीय किसान सभे’च्या वतीने प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा प्रारूप २०२६’ याला शासनाने दिलेल्या स्थगितीला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. गेली २० वर्षे देवस्थानच्या इनाम भूमी शेतकर्‍यांच्या नावाने कराव्यात, या मागणीसाठी किसान सभा आंदोलन आहे. त्यामुळे लवकरात लवकर देवस्थान भूमी खालसा करून शेतकर्‍यांना द्याव्यात, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या प्रसंगी अन्य पदाधिकार्‍यांच्या समवेत ‘अखिल भारतीय किसान सभे’चे सचिव गुलाब मुलाणी उपस्थित होते. (आजपर्यंत ‘अखिल भारतीय किसान सभे’ने कधी वक्फ बोर्ड विसर्जित करून वक्फ केलेल्या सर्व भूमी शेतकर्‍यांच्या नावे करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले आहे का ?  – संपादक)

संपादकीय भूमिका

मंदिरांच्या भूमींवर डोळा ठेवणारी ‘अखिल भारतीय किसान सभा’ ‘लँड जिहाद’विषयी बोलेल का ?