‘एल् निनो’मुळे राज्यात पावसाची कमतरता झाल्याचे प्रकरण
(जेव्हा मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे पाणी सामान्यापेक्षा अधिक गरम होते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल् निनो’, असे म्हणतात.)

पणजी, १४ जून (वार्ता.) – ‘एल् निनो’मुळे गोव्यातील हवामान पालटले आहे. यामुळे गोव्यात उष्णतेमध्ये वाढ होणे, पावसाची कमतरता आदी दुष्परिणाम समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘राज्यात कूपनलिकांचा वापर करणार्यांनी पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. यासंबंधी जलस्रोत खाते लवकरच परिपत्रक काढणार आहे. राज्यातील भूजल पातळीवर परिणाम होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अजूनही पाऊस चालू झालेला नाही. हवामान खात्याने यंदा पाऊस अल्प पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. आताच आपण पाणी जपून न वापरल्यास पुढील वर्षी पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे.’’
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर