प्रारंभिक अहवालातील निष्कर्ष

पुणे – संरक्षक रूळात (गार्ड रेल) अधिक अंतर राहिल्याने मुंबईहून सोलापूरला जाणार्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’चा २७ एप्रिल या दिवशी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात अपघात झाला होता. ही अभियांत्रिकी चूक असल्याचा अहवाल मध्य रेल्वेच्या चौकशी समितीने दिला आहे.
हा ‘वंदे भारत’चा देशातील पहिला अपघात ठरला. रेल्वे प्रशासनाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने प्रारंभिक अहवाल दिला असून अभियांत्रिकी विभागाकडून चूक झाल्याने डब्याचे पुढील चाक घसरून अपघात झाला असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.
पुणे स्थानकाच्या आवारातील ‘डायमंड क्रॉसिंग’जवळच्या २ रूळांमध्ये अंतर वाढल्याने चाकाचे नियंत्रण सुटले. या वेळी रेल्वेचा घंटा १० कि.मी. असा वेग होता. हा वेग अधिक असता तर अपघाताची तीव्रता वाढली असती.
‘गार्ड रेल’ म्हणजे काय?
मुख्य रूळांच्या समांतर आणि काही अंतरापर्यंत जे अतिरिक्त रूळ बसवले जातात त्याला ‘गार्ड रेल’ म्हणतात. ते मुख्य रूळांपेक्षा थोडे वेगळे असतात. रेल्वेचे चाक मुख्य रूळावरून घसरले, तर ‘गार्ड रेल’मुळे घसरलेले चाक या २ रूळांच्या मध्ये अडकून रहाते. मोठा अपघात होत नाही.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
आरोपीवर दोषारोप निश्चित !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
कोंढवा (पुणे) येथे मुसलमान फैयाजने केला सामाजिक कार्यकर्त्या महिलेचा विनयभंग !
निवडणूक खर्चाचा हिशेब न दिलेले ४० उमेदवार ३ वर्षांसाठी अपात्र !