नवी देहली – देहली जिमखाना क्लब प्रकरणावर केंद्र सरकारने देहली उच्च न्यायालयाला स्पष्ट केले की, ते क्लबच्या भूमीवर बलपूर्वक नियंत्रण मिळवणार नाहीत.
५ जूनपर्यंत जागा रिकामी करण्याची मुदत केवळ क्लबला स्वेच्छेने जागा रिकामी करण्यासाठी देण्यात आली आहे. जर क्लबने भूमी रिकामी केली नाही, तर सरकार कायद्यानुसार ठरलेल्या प्रक्रियेचेच पालन करेल. तसेच भूमी परत घेतल्यानंतरही सदस्यांचे सदस्यत्व कायम राहील. जिमखाना क्लबला दुसर्या ठिकाणी पर्यायी भूमी दिली जाईल, असे आश्वासनही सरकारने दिले आहे.
सरकारला कशासाठी हवी आहे भूमी ?
ल्युटियन्स भागात असलेली ही मालमत्ता २७.३ एकरमध्ये पसरलेली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, ही भूमी पंतप्रधान निवास आणि उच्च-सुरक्षा क्षेत्र यांच्याजवळ आहे. या जागेचा वापर संरक्षण पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षा यांसाठी केला जाणार आहे. भाडे कराराच्या ‘कलम ४’अंतर्गत ‘सार्वजनिक हेतूंसाठी’ भूमी परत घेण्याचा अधिकार सरकारला आहे.

हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !