८ लाखांहून अधिक अंडीही नष्ट

नंदुरबार – कोंबड्यांमुळे होणार्या ‘बर्ड फ्ल्यू’या आजाराच्या संसर्गामुळे नवापूर येथे गेल्या ४ दिवसांत १ लाख ९३ सहस्र ६६७ कोंबड्या मारण्यात आल्या. त्यांची ८ लाखांहून अधिक अंडीही नष्ट करण्यात आली आहेत. या भागातील नागरिकांना चिकन आणि अंडी खाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. २१.२२ मेट्रिक टन पशूखाद्य भूमीत गाडून नष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय खाचणे यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर १५० कर्मचार्यांच्या २५ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसर्ग रोखण्यासाठी १ किलोमीटर, ३ किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा परिघांत क्षेत्र निश्चित करून उपाययोजना चालू करण्यात आल्या आहेत. कुक्कुटपालन केंद्रातील नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी दक्षता घेतली जात आहे.
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !