
नांदेड – कर्तव्यदक्ष आणि धडाडीच्या कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे ‘दिव्यांग कल्याण विभाग’ सचिव पदावरून केलेले स्थानांतर त्वरित रहित करावे, या मागणीसाठी ८ एप्रिल या दिवशी येथे दिव्यांग बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. दिव्यांगांनी ‘तुकाराम मुंढे यांचे स्थानांतर रहित झालेच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांचे आपत्ती व्यवस्थापन विभागात स्थानांतर केले आहे. दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून काम करतांना मुंढे यांनी अनेक लोकहितवादी निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्यकाळात दिव्यांग बांधवांना न्याय मिळत होता. जिल्हाधिकारी कार्यालयात विधीमंडळ अंदाज समितीची महत्त्वाची बैठक चालू असतांनाच हे आंदोलन करण्यात आले. आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहून प्रशासनाने परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मंत्रालयातील आंदोलनानंतर आता राज्याच्या इतर भागांतही वरील मागणी करण्यात येत आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !