
अहिल्यानगर – नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्यातील २८ आरोपींच्या ७२ मालमत्ता शासनाने जप्त केल्या आहेत. नगर अर्बन बँकेमध्ये २९१ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. (एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा लेखापरीक्षकांच्या लक्षात आला नाही का ? – संपादक) शासनाने कारवाई करून १० संचालक, ४ अधिकारी, तसेच कर्जदार अशा २८ जणांच्या ७२ मालमत्ता जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तसेच उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ठेवी परत करण्यास बँक अपयशी ठरली आहे. त्यामुळे वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी मालमत्ता जप्त करणे, तसेच अन्य मालमत्तांवर नियंत्रण ठेवणे, यासाठी अहिल्यानगरचे उपविभागीय दंडाधिकार्यांनी नियुक्ती केली आहे.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !