राजकीय पक्ष आणि सनातन संस्था यांमधील भेद
सनातन संस्थेमध्ये कार्यकर्ते नसून साधक असल्यामुळे ते प्रत्येक कार्य ‘सेवा’ म्हणून करतात. त्यामुळे ते स्वतःहून पुढाकार घेऊन कार्य करतात. त्यामुळे सनातनला साधकांच्या संदर्भात वरील प्रमाणे शंका कधीच येत नाही.
सनातन संस्थेमध्ये कार्यकर्ते नसून साधक असल्यामुळे ते प्रत्येक कार्य ‘सेवा’ म्हणून करतात. त्यामुळे ते स्वतःहून पुढाकार घेऊन कार्य करतात. त्यामुळे सनातनला साधकांच्या संदर्भात वरील प्रमाणे शंका कधीच येत नाही.
‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर ‘सनातन प्रभात’मध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’
एकीकडे सत्संगाला जायचे आणि दुसरीकडे राग, द्वेष, लोभ, ममता इत्यादींना कवटाळून बसायचे ! अशाने आयुष्यभर सत्संगात जात राहिले, तरी काय होणार ?
‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
योगशास्त्रातील समाधी, ही एक अवस्था आहे, जी अस्थायी आहे. आत्मज्ञान ही अवस्था नसून आत्मस्वरूप आहे.
गुन्हे करणार्या रज-तम प्रधान गुन्हेगारांना गुन्हा केल्यानंतर शिक्षा देण्यापेक्षा ‘त्यांच्याकडून गुन्हा होऊ नये’, यासाठी त्यांच्याकडून आधीच तीव्र साधना करवून घ्या !’
‘इतर पंथियांचे ध्येय असते ‘दुसर्या धर्मियांवर अधिकार गाजवणे’, तर हिंदूंचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
समाधीमधून व्युत्थान होऊन, म्हणजे पुन्हा जागृत अवस्थेत येऊन, संसार-व्यवहार मागे लागतो. पण अज्ञानी व्यक्तीचे अज्ञान नष्ट होऊन आत्मज्ञान झाल्यावर पुन्हा कधीही त्यातून व्युत्थान म्हणजे पुन्हा अज्ञानात जाणे, होत नाही.
‘मंदिरातील कर्मचारी दर्शनार्थींना दर्शन देण्याव्यतिरिक्त आणखीन काय करतात ? त्यांनी दर्शनार्थींना धर्मशिक्षण दिले असते, साधना शिकवली असती, तर हिंदूंची आणि भारताची अशी केविलवाणी स्थिती झाली नसती.’
‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’