परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘श्रीरामाला रावणाने श्रीलंकेत नेलेल्या सीतेला शोधता आले; पण पोलिसांना एखाद्या गावातील साध्या चोरांना पकडता येत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘श्रीरामाला रावणाने श्रीलंकेत नेलेल्या सीतेला शोधता आले; पण पोलिसांना एखाद्या गावातील साध्या चोरांना पकडता येत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात राहतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखाद्या विषयावर अभ्यास नसतांना त्यावर बडबडणारे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘काँग्रेस’ हे इंग्रजी नाव असलेला पक्ष स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशाचे भले करू शकला नाही, यात आश्चर्य ते काय !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन
‘संशोधनासाठी वापरण्यात येणार्या उपकरणांना हिंदु धर्माची श्रेष्ठता कळते, तर बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांना कळत नाही, हे लक्षात ठेवा.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्ञानाविषयी मार्गदर्शन
‘प्रजा सात्त्विक असली, तरच लोकशाहीला अर्थ असतो. प्रजा हल्लीसारखी स्वार्थी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात निष्क्रीय असली, तर लोकशाही कशी असते, याचे भारत हे जगातील एकमेव केविलवाणे उदाहरण आहे !’
मंदिराच्या विश्वस्तांनो, दुकानदार गिर्हाईकाकडून पैसे घेऊन त्याला वस्तू देतो. तसे मंदिरवाले दर्शनाआधी किंवा नंतर पैसे घेतात. अशी हल्लीची स्थिती झाली आहे.
‘स्वातंत्र्यपूर्व काळात पाश्चात्त्य देशांचा प्रभाव पडलेले नेते आणि तथाकथित समाजसुधारक यांनी सत्त्वगुणप्रधान हिंदु संस्कृतीला डावलून रज-तमप्रधान पाश्चात्त्य संस्कृतीचा भारतात प्रसार केला . . . आज बहुसंख्य समाज साधना न करणारा आणि रज-तमप्रधान झाला. परिणामी भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गरिबी अशा सर्वच स्तरांवर देश रसातळाला गेला आहे !’