ईश्वरी राज्यातील शिक्षणाचा प्रमुख उद्देश !
‘जगातील एकाही देशाचे राज्यकर्ते ‘जनता सात्त्विक व्हावी’, या उद्देशाने तिला साधना शिकवत नाहीत. ईश्वरी राज्यातील शिक्षणाचा हा प्रमुख उद्देश असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘जगातील एकाही देशाचे राज्यकर्ते ‘जनता सात्त्विक व्हावी’, या उद्देशाने तिला साधना शिकवत नाहीत. ईश्वरी राज्यातील शिक्षणाचा हा प्रमुख उद्देश असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘स्वतःवर संकट येत असतांनाही सात्त्विक लोक काही वेळा क्रियमाणाचा वापर न करता ईश्वरावरील अर्धवट श्रद्धेच्या आधारे ‘होईल सर्व चांगले’ या चुकीच्या दृष्टीकोनातून त्या संकटाकडे बघतात. त्यामुळे . . . परकियांनी भारतावर आक्रमण करून येथे शेकडो वर्षे राज्य करू शकण्याचे हेच मुख्य कारण आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. ते अनंत ग्रंथांमध्ये अनंत प्रकारे मांडलेले आहे. त्यामुळे त्याचा बुद्धीने अभ्यास करण्यापेक्षा साधना करा आणि अनंताची अनुभूती घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हिंदूंनो, हिंदुस्थान ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर राममंदिर होण्यास ७७ वर्षे लागली. भारतात हिंदु राष्ट्र आल्यावर सर्वत्र मंदिरे होतीलच; पण ‘हिंदु राष्ट्र’ येण्यासाठी अजून किती काळ थांबणार ? ते लवकर येण्यासाठी आताच सर्व स्तरांवर जोमाने प्रयत्न करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राजकारणी सत्ता प्राप्त होईपर्यंत प्रयत्नरत असतात, तर साधक ईश्वरप्राप्ती होईपर्यंत प्रयत्नरत असतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्मशास्त्राच्या ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबधित शक्ती एकत्रित असतात’, या सिद्धांतानुसार आणि देवतेच्या अवताराच्या कार्यानुरूप आवश्यक असे देवतेचे ते ते रूप तयार झालेले असते. हे लक्षात न घेताच हल्ली अनेक तथाकथीत विचारवंत हिंदूंच्या देवतांच्या विविध रूपांविषयी हास्यास्पद विधाने करत असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सध्याचे पोलीस खाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्चर्य वाटणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘धर्मांध स्वधर्माच्या शिकवणीचे पालन करतात; म्हणून जगाला डोईजड झाले आहेत. याउलट हिंदूंमधील तथाकथित पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि विद्रोही हिंदूंमध्ये धर्माविषयी विकल्प निर्माण करून, फूट पाडून हिंदूंना दुबळे करतात. त्यामुळे हिंदूंना भारतातही कुणी विचारत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘निवडणुकीसंदर्भात प्रतिदिन येणार्या बातम्या वाचून वाटते, ‘आता निवडणुका हा पोरखेळ झाला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले