ईश्‍वरी राज्यातील शिक्षणाचा प्रमुख उद्देश !

‘जगातील एकाही देशाचे राज्यकर्ते ‘जनता सात्त्विक व्हावी’, या उद्देशाने तिला साधना शिकवत नाहीत. ईश्‍वरी राज्यातील शिक्षणाचा हा प्रमुख उद्देश असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतातील सात्त्विक लोकांच्या चुकीच्या दृष्टीकोनाचा परिणाम !

‘स्वतःवर संकट येत असतांनाही सात्त्विक लोक काही वेळा क्रियमाणाचा वापर न करता ईश्‍वरावरील अर्धवट श्रद्धेच्या आधारे ‘होईल सर्व चांगले’ या चुकीच्या दृष्टीकोनातून त्या संकटाकडे बघतात. त्यामुळे . . . परकियांनी भारतावर आक्रमण करून येथे शेकडो वर्षे राज्य करू शकण्याचे हेच मुख्य कारण आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माचा अभ्यास करण्यापेक्षा साधना करा !

‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. ते अनंत ग्रंथांमध्ये अनंत प्रकारे मांडलेले आहे. त्यामुळे त्याचा बुद्धीने अभ्यास करण्यापेक्षा साधना करा आणि अनंताची अनुभूती घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र येण्यासाठी जोमाने प्रयत्न करा !

‘हिंदूंनो, हिंदुस्थान ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर राममंदिर होण्यास ७७ वर्षे लागली. भारतात हिंदु राष्ट्र आल्यावर सर्वत्र मंदिरे होतीलच; पण ‘हिंदु राष्ट्र’ येण्यासाठी अजून किती काळ थांबणार ? ते लवकर येण्यासाठी आताच सर्व स्तरांवर जोमाने प्रयत्न करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकारणी आणि साधक यांमधील भेद !

‘राजकारणी सत्ता प्राप्त होईपर्यंत प्रयत्नरत असतात, तर साधक ईश्‍वरप्राप्ती होईपर्यंत प्रयत्नरत असतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तथाकथित विचारवंतांनो, हिंदूंच्या देवतांच्या रूपांसंदर्भात विधाने करण्यापूर्वी त्यामागील अध्यात्मशास्त्र जाणून घ्या !

‘अध्यात्मशास्त्राच्या ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबधित शक्ती एकत्रित असतात’, या सिद्धांतानुसार आणि देवतेच्या अवताराच्या कार्यानुरूप आवश्यक असे देवतेचे ते ते रूप तयार झालेले असते. हे लक्षात न घेताच हल्ली अनेक तथाकथीत विचारवंत हिंदूंच्या देवतांच्या विविध रूपां‍विषयी हास्यास्पद विधाने करत असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, साधनेस आरंभ करा !

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पोलीस खाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती !

‘सध्याचे पोलीस खाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिदूंना भारतातही कुणी विचारत नाही !

‘धर्मांध स्वधर्माच्या शिकवणीचे पालन करतात; म्हणून जगाला डोईजड झाले आहेत. याउलट हिंदूंमधील तथाकथित पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि विद्रोही हिंदूंमध्ये धर्माविषयी विकल्प निर्माण करून, फूट पाडून हिंदूंना दुबळे करतात. त्यामुळे हिंदूंना भारतातही कुणी विचारत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निवडणुकांचा पोरखेळ !

‘निवडणुकीसंदर्भात प्रतिदिन येणार्‍या बातम्या वाचून वाटते, ‘आता निवडणुका हा पोरखेळ झाला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले