ओडिशा राज्याच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना ४ मासांचे वेतन आगाऊ मिळणार

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या आणि कोरोनाला रोखण्यासाठी सैनिकांप्रमाणे प्रयत्न करणार्‍या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांसाठी महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे.

भारतात ८०३ कोरोनाग्रस्त रुग्ण, २० जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आतापर्यंत ७५३ झाली असून एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

शासनाच्या संचारबंदीच्या आदेशाला तिलांजली

शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास २७ मार्चपासून अनुज्ञप्ती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दुकाने उघडी होती. गेले काही दिवस किराणा दुकाने बंद असल्याने लोकांनी किराणा माल खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये एकच गर्दी केली.

उत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ४ विलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रे

शासनाने उत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ४ विलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रे सिद्ध केली आहेत. परराज्यातून गोव्यात आलेल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाने केले आहे.

कोरोनाची संख्या हळूहळू न्यून होईल ! – डॉ. के. श्रीनाथ रेड्डी, अध्यक्ष, ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया’

देशात दळणवळण बंदी आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ (एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे) केल्याने कोरोनाचा संसर्ग बर्‍याच प्रमाणात रोखता येईल……

लोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळतील, घरीच थांबावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यातजीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे; मात्र केंद्राने दिलेल्या नियमांच्या आधारावर ही दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत.

जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गोव्यात नागरिकांच्या मोठ्या रांगा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि संचारबंदीचे कठोरतेने पालन करावे, ही मागणी जोर धरत आहे. राज्यातील विविध क्षेत्रांतील लोक आता ही मागणी करू लागले आहेत.

चंद्रपूर येथील मशिदीतून १४ मौलवी कह्यात

स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी धाड टाकून येथील एका मशिदीतून ११ तुर्कस्तानी, तर भारतातील अन्य भागांतील ३ अशा एकूण १४ मौलवींना कह्यात घेतले आहे…….

मशिदीत न जाता घरातच नमाजपठण करा ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे आवाहन

भारतात ठिकठिकाणी मुसलमान नियम तोडून मशिदीत जाऊन नमाजपठण करत असल्याचे दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन मुसलमानांच्या धर्मगुरूंनी तात्काळ असे आवाहन करणे आवश्यक होते.

शेकडो कि.मी. अंतर चालत घरी जाणार्‍या मजुरांना साहाय्य करा ! – केंद्रशासनाचे राज्यशासनांना निर्देश

देशात दळणवळण बंदी झाल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर शेकडो कि.मी. अंतर चालत जात त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे….