सामाजिक अंतराच्या नियमाचे अनेक ठिकाणी उल्लंघन
पणजी, २७ मार्च (वार्ता.) – शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आजपासून उघडी ठेवण्यास अनुमती दिली होती; मात्र अनेक ठिकाणी वस्तूंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे आणि २ व्यक्तीमध्ये अंतर ठेवण्याच्या नियमाचे अनेक ठिकाणी सर्रास उल्लंघन झाल्याने लोकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी २ व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच अन्य नियमांचे पालन करावे, असे आवाहन शासन आणि पोलीस यंत्रणा यांनी केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि संचारबंदीचे कठोरतेने पालन करावे, ही मागणी जोर धरत आहे. राज्यातील विविध क्षेत्रांतील लोक आता ही मागणी करू लागले आहेत.
भित्तीपत्रक लावणार्या महिला अधिकार्याचे स्थानांतर ! – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त
देवस्थान इनाम भूमींच्या संदर्भातील प्रारूप सिद्ध करण्यासाठीच्या समितीत देवस्थानांच्या प्रतिनिधींचा समावेश !
(म्हणे) ‘हिंदूंना विभागण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागेल !’ – Maulana Sajjad Nomani
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिराच्या दानाची चोरी करणार्याच्या ७ पिढ्यांना शाप लागेल !
येत्या १५ दिवसांत येणार ‘माझा फ्लॅट’ योजना ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
‘शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’तील शिक्षिका आणि प्राचार्य यांच्या चौकशीची मागणी !