हिंदुद्रोही आस्थापनांवर बहिष्कारच हवा !
‘डाबर’ आस्थापनाने त्याचे उत्पादन ‘गोल्ड ब्लीच’ (चेहरा उजळण्यासाठीची पावडर) या उत्पादनासाठी प्रसारित केलेल्या विज्ञापनातून एक समलैंगिक जोडपे त्यांचा पहिला ‘करवा चौथ’ हे व्रत साजरे करतांना दाखवले आहे.
‘डाबर’ आस्थापनाने त्याचे उत्पादन ‘गोल्ड ब्लीच’ (चेहरा उजळण्यासाठीची पावडर) या उत्पादनासाठी प्रसारित केलेल्या विज्ञापनातून एक समलैंगिक जोडपे त्यांचा पहिला ‘करवा चौथ’ हे व्रत साजरे करतांना दाखवले आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतर आता तेथे शिल्लक राहिलेल्या शिखांना ‘अफगाणिस्तान सोडा किंवा इस्लामचा स्वीकार करा’, अशा धमक्या देण्यात आल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
प्रतिदिन सरासरी ६३२ हिंदू बांगलादेश सोडून दुसर्या देशांत आश्रय घेत आहेत. त्यामुळे वर्ष २०५० पर्यंत बांगलादेशात हिंदूच नसतील, असे मत ढाका विद्यापिठातील प्रा. डॉ. अबुल बरकत यांनी त्यांच्या पुस्तकात व्यक्त केले आहे.
बांगलादेशात कुराणाचा अवमान झाल्याचा आरोप करत धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्याच्या प्रकरणात अनेक हिंदू ठार झाले. इक्बाल हुसेन याने श्री दुर्गादेवी पूजा मंडपातील श्री हनुमानाच्या मूर्तीच्या पायाजवळ कुराण ठेवल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.
जगभरात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने ‘इंडोनेशिया मशीद परिषदे’ने हा निर्णय घेतला आहे.
काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून होणार्या हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य पहाता २४ ऑक्टोबरला होणारा ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक सामना रहित करण्यास बीसीसीआयचा नकार.
भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथे १० वी इयत्तेत शिकणार्या किरूबाकरण आणि किरूबानंदन या विद्यार्थ्यांनी गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातल्याने अन् कपाळावर विभूती लावल्याने त्यांना ख्रिस्ती शिक्षक जॉयसन यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.
बांगलादेशच्या नौखाली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर इस्कॉनच्या एका मंदिरावर २०० हून अधिक धर्मांधांनी आक्रमण करून इस्कॉनचे दोन साधू निताई दास प्रभु आणि जतन दास प्रभु, तसेच २५ वर्षीय भाविक पार्थ दास यांची हत्या केली.
फेसबूकने धोकादायक संघटना आणि व्यक्ती यांची ४ सहस्रांहून अधिक जणांची गोपनीय सूची बनवली असून यात ‘सनातन संस्थे’चे नाव आहे. या सूचीत पसार आतंकवादी झाकीर नाईक, विविध आतंकवादी कारवायांमध्ये हात असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांचा समावेश नाही.