‘ती’ सूची पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद होणार ! – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

कोरोनाबाधित असा अपप्रचार करून परदेशातून आलेल्या कोल्हापुरातील काही व्यक्तींची सूची सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद केला जाईल, अशी चेतावणी डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात ५६५ जणांना ‘होम क्वारंटाईन’ : १५ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’

रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात २३ जण निरीक्षणाखाली आहेत.

‘होम क्वारंटाईन’ व्यक्तींच्या दारावर महापालिका पत्रक लावणार

‘होम क्वारंटाईन’ असलेल्या व्यक्ती दायित्वशून्यपणे घराबाहेर पडत असल्याच्या घटना घडल्यानंतर महापालिकेने पुढचे पाऊल म्हणून ‘होम क्वारंटाईन’ व्यक्तींच्या घराच्या दारावर पत्रक लावण्याचा निर्णय घेतला आहे.

आयात रखडल्याने वाहन उद्योग अडचणीत येणार

कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसणार आहे. वाहन उद्योगासाठी लागणारे ३० ते ४० टक्के सुटे भाग चीनहून आयात होतात; मात्र चीनमध्ये उत्पादनावर मर्यादा आल्याने, तसेच आयात थांबल्याने वाहन उद्योगावर संकट निर्माण होणार आहे.

यंदा नेहमीपेक्षा उन्हाळा कडक असणार ! – हवामान विभाग

राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा कमाल तापमान ०.५ ते १ अंश सेल्सिअसने अधिक राहील. त्यामुळे राज्यात यंदा उष्णतेच्या लाटांचे प्रमाण अधिक राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य ओळखा आणि सहकार्य करा ! – जनतेला वारंवार आवाहन करण्याची शासनावर वेळ

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन विविध प्रकारे प्रयत्न करत आहे; मात्र काही ठिकाणी या प्रयत्नांना हरताळ फासला जात आहे. जनतेला अजूनही कोरोनाच्या दुष्परिणामांची जाणीव नसल्याचे चित्र दिसत असून राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतांनाही काही जण याचे उल्लंघन करत आहेत.

२५ ते ३१ मार्चपर्यंत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा व्यापार्‍यांचा निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असला, तरी २५ ते ३१ मार्चपर्यंत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला आहे.

गुढीपाडव्याला ‘मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार’ हा संकल्प करा ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी दुसरीकडे रुग्णालयात भरती असलेले रुग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे.

जमावबंदीचा आदेश असतांनांही कल्याण येथे रस्त्यावर जमणार्‍या धर्मांधांवर गुन्हा नोंद

कायदा आणि पोलीस यांचा जराही धाक नसलेले धर्मांध नेहमीच समाजघातकी आणि देशविरोधी कृत्ये करतात !

कोरोनाच्या संकटाचा कुणीही संधी म्हणून उपयोग करू नका ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मी पोलिसांचे अभिनंदन करतो की, त्यांनी लाखो रुपयांचा ‘मास्क’चा साठा पकडला आहे. आपण थोडा समजूतदारपणा दाखवला पाहिजे. आपण जगणे थांबवलेले नाही, तर अधिक जगण्यासाठी जगण्याच्या शैलीत काही पालट केला आहे.