
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांची संख्या एकूण ४४९ आहे. मुलांची वसतीगृहे २३१ आहेत, तर मुलींची वसतीगृहे २१८ आहेत. या मुलांच्या आहारात सुधारणा करण्याचा नेहमी प्रयत्न करत आहोत. राज्यात काही वसतिगृहांत काही वेळा जेवणाची चव, दर्जा यांत त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटी पडताळून संबंधित भोजन पुरवठा करणार्या ठेकेदाराला ५५ लाख रुपयांचा दंड आतापर्यंत आकारला आहे.
यापुढे विद्यार्थ्यांच्या जेवणात त्यांच्या इतर सुविधांमध्ये सरकार कुठेही अल्प पडणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी १३ डिसेंबर या दिवशी प्रश्नोत्तरात केले. सदस्य उत्तमराव जानकर यांनी राज्यातील वसतीगृहांतील विद्यार्थ्यांना होत असलेल्या गैरसोयीची माहिती देऊन सभागृहाचे लक्ष वेधले. त्या वेळी ते बोलत होते.
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात