
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांची संख्या एकूण ४४९ आहे. मुलांची वसतीगृहे २३१ आहेत, तर मुलींची वसतीगृहे २१८ आहेत. या मुलांच्या आहारात सुधारणा करण्याचा नेहमी प्रयत्न करत आहोत. राज्यात काही वसतिगृहांत काही वेळा जेवणाची चव, दर्जा यांत त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटी पडताळून संबंधित भोजन पुरवठा करणार्या ठेकेदाराला ५५ लाख रुपयांचा दंड आतापर्यंत आकारला आहे.
यापुढे विद्यार्थ्यांच्या जेवणात त्यांच्या इतर सुविधांमध्ये सरकार कुठेही अल्प पडणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी १३ डिसेंबर या दिवशी प्रश्नोत्तरात केले. सदस्य उत्तमराव जानकर यांनी राज्यातील वसतीगृहांतील विद्यार्थ्यांना होत असलेल्या गैरसोयीची माहिती देऊन सभागृहाचे लक्ष वेधले. त्या वेळी ते बोलत होते.
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री