चीनवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात उणावणार !

जयपूर (राजस्थान) – राज्यातील नागौर जिल्ह्यात लिथियमचा तब्बल १ कोटी ४० लाख टन साठा सापडला आहे. या धातूचा वापर भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, विद्युत् वाहने यांची बॅटरी, तसेच पुनर्भरणीय (रिचार्जेबल) बॅटरी यांचे उत्पादन करण्यासाठी केला जातो. यामुळे आता राजस्थानचा महसूल वाढण्यासह रोजगाराच्या संधीही प्रचंड प्रमाणात वाढतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियमचा साठा सापडल्यामुळे भारताची लिथियमची ८० टक्के मागणीची पूर्तता होऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे. याआधी जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा ५० लाख टन साठा सापडला होता.
लिथियम उत्खननासाठी लिलाव प्रक्रिया चालू !
नागौरच्या डेगाना भागात लिथियम साठा मिळाल्यामुळे भारताची चीनवरील अवलंबित्व संपणार आहे. रेवंत पर्वतरांगांमध्ये सापडलेला हा साठा तब्बल १ सहस्र ४०० किलो एवढा असल्याचा अनुमान आहे. केंद्रीय खनन मंत्रालयाने लिथियम उत्खननासाठी लिलाव प्रक्रियाही चालू केली असून अर्ज घेण्याचा अंतिम दिनांक १ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आला आहे.
लिथियम धातूविषयीची माहिती !

लिथियम हा अत्यंत हलका धातू आहे. हवेतील प्राणवायूच्या तो संपर्कात येताच पेट घेतो. लिथियम मऊ, चांदीसारखा पांढरा आणि तेजस्वी असतो. यामुळेच त्याला ‘पांढरे सोने’ म्हटले जाते.
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !