महाविकास आघाडीच्या काळात ४ वेळा माझ्या अटकेचा प्रयत्न झाला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई – महाविकास आघाडीच्या काळात मला आणि भाजपचे अन्य नेते यांना अटक करण्याविषयी प्रयत्न करण्यात आले, हे परमवीर सिंह यांनी केलेले वक्तव्य खरे आहे. त्यांनी केवळ घटना सांगितली. प्रत्यक्षात मला अटक करण्यासाठी ४ वेळा प्रयत्न करण्यात आला, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना केला.

याविषयी आम्ही केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे पुरावे दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्यासह भाजपच्या अनेक नेत्यांना कारागृहात टाकण्याची सुपारी काही पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आली होती. त्यांनी ती सुपारी घेतलीही होती; पण त्यांना यश मिळाले नाही. काही चांगल्या अधिकार्‍यांनी असे खोटे गुन्हे नोंदवण्यास नकार दिला, असे या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.