मुंबईत चालू असलेली पाणीकपात रहित !

मुंबई – धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यामुळे मुंबईत सध्या चालू असलेली पाणीकपात मागे घेण्यात येणार आहे. २९ जुलैपासून मुंबईतील १० टक्के पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घोषित केला आहे. महानगरपालिकेने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली होती.