
पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास आजपासून आरंभ झाला; मात्र आळंदी मंदिर विश्वस्त निवडीवरून आळंदीकरांनी ५ डिसेंबरला गावबंदची घोषणा केली होती. सकाळी १० वाजता मोर्चा काढण्यात आला. यानंतर देवस्थानच्या विश्वस्तांनी ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावले; मात्र त्याला ग्रामस्थांनी नकार दिला. अखेर दुपारनंतर वारकर्यांची असुविधा टाळण्यासाठी ग्रामस्थांनी ‘आळंदी बंद’चा निर्णय मागे घेतला. गावकर्यांनी ‘आळंदी बंद’चा निर्णय मागे घेतल्यानंतर बाजारपेठ पुन्हा गजबजली आहे.
१. आळंदी देवस्थानच्या ३ विश्वस्तांची निवड नुकतीच करण्यात आली असून यात योगी निरंजननाथ, अधिवक्ता राजेंद्र उमाप आणि डॉ. भावार्थ देखणे यांचा समावेश आहे. या विश्वस्तांमध्ये एकाही स्थानिक व्यक्तीची निवड न करण्यात आल्याने ५ डिसेंबरला बंद घोषित करण्यात आला होता.
२. दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी सहस्रो भाविक-वारकरी अलंकापुरीत येण्यास प्रारंभ झाला आहे. अशा वेळी आळंदी बंद ठेवू नये; म्हणून देवस्थानने ग्रामस्थांना आवाहन केले होते; मात्र ग्रामस्थ त्यांच्या मागणीवर ठाम होते.
३. अखेर आळंदीतील चाकण चौक येथून या निषेध मोर्च्याला आरंभ झाला आणि संत ज्ञानेश्वर महाराज महाद्वार चौक येथे सभा होऊन या मोर्च्याची सांगता झाली.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले