आतंकवादी कृत्याला कधी विसरू नका, कधीही क्षमा करू नका ! – ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त

मुंबईतील २६/११ आतंकवादी आक्रमण

लंडन (इंग्लंड) – मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाला नुकतीच १५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त येथील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोरईस्वामी यांनी म्हटले. ‘आतंकवादासारखे असे भयंकर कृत्य कधीही विसरू नका, त्याला क्षमा करू नका आणि असे कृत्य पुन्हा होऊ देणार नाही’, हीच आमची भूमिका आहे.’

दोरईस्वामी हे लंडन येथील इंडिया हाऊसमध्ये २६/११ च्या आतंकवादी आक्रमणात मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला युनायटेड किंगडमच्या संसदेतील काही खासदारही उपस्थित होते.