Assam government employees Second marriage : दुसरा विवाह करायचा असल्यास सरकारची अनुमती घ्यावी लागणार !

आसाममध्ये सरकारी कर्मचार्‍यांसाठी नवा नियम !

गौहत्ती (आसाम) – यापुढे आसाममध्ये जर कुठल्याही सरकारी कर्मचार्‍याला दुसरा विवाह करायचा असेल, तर त्यासाठी त्याला सरकारकडून अनुमती घ्यावी लागणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले की, जर कुणा सेवारत अथवा निवृत्त कर्मचार्‍याचा मृत्यू झाला, तर अनेक वेळा त्याच्या एकपेक्षा अधिक पत्नींकडून निवृत्तीवेतनाची मागणी केली जाते. त्यामुळे सरकारसमोर अनेक समस्य निर्माण होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांनाही या नियमाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

सौजन्य सीएनबीसी-टीव्ही 18 

संपादकीय भूमिका 

केंद्र सरकारने असा नियम देशपातळीवर करावा, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !