निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४६

‘पावसाळ्यामध्ये शरिरात पित्ताच्या वाढीसाठी पूरक परिस्थिती निर्माण झालेली असते; परंतु वातावरणात गारवा असल्यामुळे पित्त प्रमाणाबाहेर वाढत नाही. पावसाळा संपल्या संपल्या वातावरणात उष्णता वाढल्यामुळे पित्त प्रमाणाबाहेर वाढते. याला ‘पित्ताचा प्रकोप होणे’, असे म्हणतात. यामुळे डोळे येणे, तोंड येणे, घशात किंवा छातीत जळजळ होणे, हातापायांची आग होणे, गळू होणे, मूत्रमार्गाची, तसेच गुदद्वाराजवळ जळजळ होणे, अंगावर पुरळ येणे यांसारखे त्रास होऊ शकतात. शरिरात प्रमाणाबाहेर वाढलेले पित्त काढून टाकले, तर पुढे होणारे हे सर्व त्रास टाळता येऊ शकतात. यासाठी प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी चहाचा अर्धा चमचा एरंडेल तेल पिऊन वर अर्धी वाटी कोमट पाणी प्यावे. एरंडेलाचे अर्धा चमचा हे प्रमाण अत्यंत अल्प आहे. याने सहसा जुलाब होत नाहीत; परंतु एखाद्याला जुलाब झाल्यास त्याने त्या दिवसापासून एरंडेल तेल पिणे थांबवावे. जुलाब न झाल्यास ७ दिवसांनी एरंडेल तेल पिणे थांबवावे. १० वर्षांखालील मुलांना पाव चमचा एरंडेल तेल द्यावे. ४ वर्षांखालील मुलांना एरंडेल तेल देण्याची आवश्यकता नाही.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२३)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !