अधर्मी लोकांचा नाश आणि धर्मनिष्ठांचा उदय, हाच हिंदुस्थानी मातीचा संदेश ! – विनोदकुमार यादव, हिंदु जागरण मंच, बिहार

एका विदेशी पत्रकाराने त्याच्या लेखात लिहिले आहे, ‘जे मुसलमान भारतावर शेकडो वर्षे राज्य करून भोगी आणि विलासी जीवन जगले, त्यांचे वंशज आज त्याच हिंदुस्थानात स्वयंपाक करत असून लोकांचे उष्टे-खरकटे काढत आहेत. याउलट याच मुसलमानांशी २२ वर्षे कडवी झुंज देणार्‍या आणि प्रसंगी जंगलात गवताच्या भाकर्‍या खाव्या लागणार्‍या महाराणा प्रतापचे वंशज लोकहितपयोगी जीवन जगत आहेत.’ जगातील सर्व देशांतील मातीपेक्षा हिंदुस्थानची माती निराळी आहे. या मातीचा सुगंध निराळा आहे. ‘अधर्मी लोकांचा नाश होईल आणि जो धर्माच्या बाजूने चालेल, त्याच्या मुलाबाळांच्या चरणांची धूळ मस्तकी लावण्यासाठी हा हिंदुस्थान उठून उभा राहील,’ असा धर्मसंदेश या देशाची माती देत राहील.