हिंदु जागे झाले नाहीत, तर काश्मीरसारखी स्थिती होईल ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री, बागेश्‍वर धाम

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची हिंदूंना चेतावणी !

अलवर (राजस्थान) – हिंदूनो जागे व्हा, अन्यथा काश्मीरसारखी स्थिती होईल. तुमच्या मुलींचा हाल साक्षी (देहली येथे साक्षी नावाच्या मुलीची मुसलमानाने हत्या केली होती) हिच्यासारखा होईल. तुमची घरे जाळली जातील. यासाठीच जागे व्हा, असे आवाहन बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे हिंदूंना केले. येथील माजी मंत्री भंवर जितेंद्र सिंह यांच्या निवासस्थानी आयोजित धर्मसभेत ते बोलत होते.

तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला हिंदु राष्ट्र देईन !

हिंदु राष्ट्राविषयी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री उपस्थितांना म्हणाले की, तुम्ही हिंदु असाल, तर तुमच्या घरांवर भगवा ध्वज फडकवा. कपाळावर टिळा लावा. देशाला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी सिद्ध व्हा. मी जर जिवंत राहिलो, तर हिंदु राष्ट्र बनवण्याचा संकल्प लवकरच पूर्ण होईल. तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला हिंदु राष्ट्र देईन. यासाठी घराबाहेर पडावे लागेल. जर कुंभकर्णापेक्षा अधिक कुणी झोपला असेल, तर तो सनातनी होय.