‘बरेच जण म्हणतात की, १९७६ मध्ये जरी राज्यघटनेत ‘सेक्युलर’ शब्द जोडला गेला असला, तरी राज्यघटनेचा मूलभाव आणि रचना पहिल्यापासूनच ‘सेक्युलर’ होती. हा एक अपसमज आहे. जर अनुच्छेद २५ ते २८ हे ‘सेक्युलॅरीझम’चा पाया (बेसिक्स ऑफ सेेक्युलॅरीझम) आहे, असे म्हटले, तर त्याच्यापुढील अनुच्छेद २९ आणि ३० हे ‘सेक्युलॅरीझम’च्या विरुद्ध (अगेन्स्ट ऑफ सेक्युलॅरीझम) आहेत. उदाहरण सांगायचे, तर अनुच्छेद २८ मध्ये म्हटले आहे की, सरकारी किंवा सरकारद्वारे अनुदानित कुठल्याही शिक्षणसंस्थांमधून कुठल्याही धर्माचे शिक्षण देता येणार नाही. जर अशा प्रकारे कुठलीही शिक्षणसंस्था धर्मशिक्षण देत असेल, तर तिची शैक्षणिक मान्यता रहित केली जाईल. म्हणूनच शाळा-महाविद्यालयांमध्ये गीता, रामायण, महाभारत इत्यादी काही शिकवता येत नाही. हे अनुच्छेद वरपांगी ‘सेक्युलर’ वाटते; पण जेव्हा अनुच्छेद ३० वाचतो, तेव्हा अनुच्छेद २८ केवळ बहुसंख्य हिंदूंना लागू आहे, हे कळते. अनुच्छेद ३० मध्ये म्हटले आहे की, धार्मिक अल्पसंख्यांकांना शाळा चालू करण्याचा, त्या संचालित करण्याचा आणि त्यात त्यांचे धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार आहे. तसेच आवश्यकतेनुसार सरकार या शिक्षणसंस्थांना अनुदान देईल. याचा अर्थ मदरसा असू शकतो, त्यामध्ये कुराण अन् हदीस शिकवले जाऊ शकते. आवश्यकता भासल्यास सरकार या धार्मिक शिक्षणसंस्थांना अनुदान देईल. हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास बंदी आणि अल्पसंख्यांकांना धर्माचे शिक्षण देण्याची संवैधानिक व्यवस्था, हा कुठला ‘सेक्युलर’वाद आहे ?’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > राज्यघटनेचा मूलभाव ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आहे, असे म्हणणे, हा अपसमज !
राज्यघटनेचा मूलभाव ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आहे, असे म्हणणे, हा अपसमज !
नूतन लेख
- काय भारताला मरण प्राप्त होईल ?
- सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी ‘सनातन संस्था’ हे फार मोठे व्यासपीठ !
- बकरी कापण्यासाठी ‘ऑनलाईन’ अनुमती बंद करण्याविषयी न्यायमूर्तींना भाग पाडले !
- पोलीस काही कृती करत नसल्यानेच जनतेला कृती करावी लागते !
- पोलीस काही कृती करत नसल्यानेच जनतेला कृती करावी लागते !
- शोभायात्रा काढतांना त्यात सहभागी महिला आणि मुले यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना हवी !