
निपाणी – अधिवक्ता गणेश गोंधळी यांच्यावर हुबळी येथे अज्ञात समाजकंटकांनी आक्रमण केले आहे. तरी अधिवक्ता गणेश गोंधळी यांच्यावर आक्रमण करणार्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष प.पू. प्राणलिंग स्वामी यांनी केली. निपाणीचे तहसीलदार प्रवीण कारंडे यांना विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी त्यांनी ही मागणी केली.
या वेळी श्री दत्तपीठ तमनकावाड्याचे मठाधीश प.पू. सद्गुरु साचीदानंद बाबा, श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्रभुलिंग स्वामीजी, मातृशक्तीच्या जिल्हाप्रमुख सुचित्रा कुलकर्णी, विश्व हिंदु परिषद निपाणीचे प्रमुख मृणाल कुरबेट्टी, अभिजित सादळकर, रोहन राऊत, उत्तम कमते, चारुदत्त पावले, बजरंग दलाचे निपाणी शहराध्यक्ष प्रवीण भिसे, युवराज जाधव, योगेश चौगुले, मायाप्पा राहुत, सागर श्रीखंडे यांसह अन्य उपस्थित होते.
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !
माहिती मिळवतांना केलेल्या प्रावधानांचा पुनर्विचार करून नियमावली रहित करावी ! – माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली
१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती