१४ जणांविरोधात गुन्हा नोंद !

आळंदी (जिल्हा पुणे) – येथील मरकळ गावात काही जण लोकांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोकांच्या घरासमोर जाऊन ‘तुम्ही बायबल वाचता का ? चर्चमध्ये या, आम्ही तुमच्या व्यवसायाला आर्थिक साहाय्य करू’, असे आमीष दाखवत आहेत. या प्रकरणी १४ जणांवर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद झाला. यात ३ महिला आरोपी आणि एक अल्पवयीन मुलगी यांचा समावेश आहे. प्रसाद साळुंखे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. काही दिवसांपूर्वीच आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न झाल्याने धर्मांतरबंदी कायद्यासाठी १५ जानेवारीला विराट जनमोर्चा काढण्यात आला. दुसर्याच दिवशी धर्मांतराची घटना समोर आली. साळुंखे म्हणाले, ‘‘या लोकांनी कुटुंबांचा पुष्कळ छळ केला. प्रदीप वाघमारे आणि प्रशांत वाघमारे हे लोकांना पैशांचे आमीष दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास सांगत होते. आमच्या घरातील देवतांचे चित्र बघून त्यांना शिव्या दिल्या. ‘जो स्वतः भीक मागतो, तो तुमचा देव तुम्हाला काय वाचवणार ?’, असे म्हणून त्यांनी हिंदु देवतांना भिकारी संबोधले.
संपादकीय भूमिका
|
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास भारतावर टीका करण्यास मागेपुढे पहाणार नाही !’ – US Lawmakers
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !