
मुंबई – पालघर जिल्ह्यातील गडचिंचाळे गावात एप्रिल २०२० मध्ये जमावाने आक्रमण करून २ साधू आणि त्यांच्या गाडीचा चालक यांची हत्या केली होती. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयात १५ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने नुकतीच केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला या प्रकरणाच्या अन्वेषणाला अनुमती दिली आहे. श्री पंच दशबन जुना आखाडाचे साधू, मृत साधूंचे नातेवाईक, अधिवक्ता घनश्याम उपाध्याय आणि शशांक शेखर यांनीही न्यायालयात याचिका करून या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. या आक्रमणात कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज आणि मुंबईच्या कांदिवली येथील नीलेश तेलगडे यांची जमावाने पोलिसांच्या उपस्थितीत निर्घृण हत्या केली होती.
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !
मंदिर महासंघाच्या प्रयत्नांमुळे ‘इनाम निर्मूलन विधेयक’ स्थगित करावे लागले
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !
Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक