
नाशिक – भारतात लवकरात लवकर आर्थिक निकषांवर आरक्षण आणि समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, संविधान म्हणजे सम-विधान, अर्थात् प्रत्येकाला समानतेचा अधिकार; पण भारत स्वतंत्र झाल्यापासून जातीयवाद वाढला आहे. धर्मशास्त्रात कुठेही जातीचा उल्लेख नाही. लोकशाहीचा मूळ आधार हा समानतेचा अधिकार आहे; परंतु आज जातीच्या आधारे आरक्षण देण्याऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण आणि समान नागरी कायदा यांची पुष्कळ आवश्यकता आहे. आज अनेक मंदिरे, हिंदूंची धार्मिक स्थळे सरकारच्या कह्यात आहेत. अनेक प्रशासकीय अधिकारी त्या संस्थेचे अध्यक्ष असतात; परंतु कोणतेही चर्च-मशीद सरकारच्या कह्यात नाही आणि कोणतेही प्रशासकीय अधिकारी या संस्थांवर कार्यरत नाहीत. हा भेदभाव का ? अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे लवकरात लवकर भारतात आर्थिक निकषावर समान नागरी कायदा लागू करावा, ही नम्र विनंती. आपण घेतलेला निर्णय पुढील पिढीला प्रेरणादायी ठरावा, ही ईश्वरचरणी प्रार्थना !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !