
चंद्रपूर, २७ सप्टेंबर (वार्ता.) – देशातील केवळ १५ टक्के असणार्या मुसलमान समाजाला इस्लामवर आधारित हलाल हवे आहे; म्हणून ते उर्वरित ८५ टक्के मुसलमानेत्तर जनतेवर लादणे, हे त्यांना घटनेने दिलेल्या धार्मिक आणि ग्राहक अधिकारांच्या विरोधात आहे. त्यामुळे भारत सरकारने ‘रेल्व सेवा’ आणि ‘पर्यटन महामंडळ’ यांसारख्या ज्या निधर्मी संस्थांमध्ये हलाल अन्नपदार्थ पुरवले जातात, ते त्वरित बंद करण्याचे आदेश काढावेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी बलारशा येथील व्यापारी संघटन मेळाव्यात केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री बालाजी मंदिराच्या सभागृहात या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. तेव्हा ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’ यांसारख्या खासगी बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून १०० टक्के हलाल पदार्थांची विक्री असल्याने तेही बंद करण्यात यावे.’’ या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हिंदुत्वनिष्ठ सौ. ज्योती दिलीप मामीडवार यांनी पुढाकार घेला होता. या कार्यक्रमाला पुष्कळ व्यावसायिक उपस्थित होते.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान