
मुंबई – काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मागील काही दिवसांपासून कारवाई चालू केली आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने २१ जुलै या दिवशी मुंबई आणि नागपूर येथील संचालनालयाच्या कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला. विरोधी पक्षांच्या नेत्यांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकार ही कारवाई करत असल्याचा आरोप आंदोलकांनी या वेळी केला. काँग्रेसच्या वतीने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली, तर नागपूर येथे माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. पुणे, नाशिक आणि अमरावती येथेही आंदोलन करण्यात आले.
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !