जिहादी आतंकवादी संघटना ‘पी.एफ्.आय’ ‘एन्.डी.टी.व्ही.’ आणि ‘बीबीसी’ यांच्याशीच बोलणार !

पाटलीपुत्र (बिहार) – वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवू पहाणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी आतंकवादी संघटनेने म्हटले आहे की, ते केवळ ‘एन्.डी.टी.व्ही.’ आणि ‘बीबीसी’ या वृत्तवाहिन्या, तसेच ‘द वायर’ हे वृत्तसंकेतस्थळ यांच्या पत्रकारांशीच वार्ता करणार आहेत ! काही दिवसांपूर्वी विविध राज्यांतील मुसलमानांना तलवारी, चाकू आदींचे प्रशिक्षण देत असल्याच्या पाटलीपुत्र येथील षड्यंत्राचा भांडाफोड करण्यात आला होता. त्यामध्ये दोन आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आणि त्यातून त्यांचे राष्ट्रीय स्तरावर चालू असलेले षड्यंत्र उघडकीस आले.

अनेक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दोघा आरोपींपैकी अथर परवेझ याच्या भावाच्या घरी अथरची माहिती जाणून घेण्यासाठी जात आहेत. त्यामुळे त्याने त्याच्या घरासमोर वरील आशयाचे एक पोस्टरच लावून टाकले आहे.

संपादकीय भूमिका

संबंधित वृत्तवाहिन्यांचे ‘जिहाद्यांशी असलेले संबंध’ स्पष्ट होण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नव्हे का ? भारताने ‘पी.एफ्.आय.’समवेतच जिहादी आतंकवादाची तळी उचलणार्‍या अशा वृत्तवाहिन्यांवरही आता बंदी लादली पाहिजे ! शासनाच्या या कृतीवर जर कुणी उपटसुंभ ‘सरकार पत्रकारितेची गळचेपी करत असल्या’ची आवई उठवू लागला, तर अशा राष्ट्रघातक्यांवरही कठोर कारवाई करण्याची व्यवस्था सरकारने आताच करावी !