(म्हणे) ‘तुम्ही गुप्तांगांची पूजा का करता ? तुमचा त्याच्याशी काय संबंध ?’

मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) इलियास शराफुद्दीन याचे वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात हिंदूंना प्रश्‍न !

डावीकडे मौलवी इलियास शराफुद्दीन

नवी देहली – तुम्ही गुप्तांगाची पूजा का करत आहात ? तुम्ही असे का करत आहात ? वेद, गीता यांच्या विरोधात जाऊन श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या विरोधात जाऊन तम्ही लिंगाची पूजा का करत आहोत ? तुमचा लिंगाशी काय घेणे-देणे आहे ?, असे प्रश्‍न ‘झी न्यूज’ या हिंदी वृत्तावाहिनीवर ज्ञानवापीविषयी चालू असलेल्या चर्चासत्रात मौलवी इलियास शराफुद्दीन याने विचारले. प्रश्‍न विचारतांना तो कुत्सितपणे हसत होता. या चर्चासत्रात ठाकुर देवकीनंदन सहभागी झाले होते. मौलवीच्या विधानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. यावरून भाजपचे नेते तजिंदर पाल बग्गा यांनी ‘उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.

मौलवी इलियास याने चर्चासत्रात थोड्या वेळाने पुन्हा हेच प्रश्‍न विचारत म्हटले, ‘तुम्ही लिंग आणि योनी यांची पूजा का करत आहात ? कोट्यवधी हिंदूंना नरकात का नेत आहात ? त्यांना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या मार्गावर आणा. रावण आणि कंस यांचा मार्ग सोडा.’ (ज्यांना मूर्तीपूजा अमान्य आहे, त्यांना मूर्तीपूजा करणार्‍या हिंदु धर्माविषयी बोलण्याचा काय अधिकार ? या मौलवीच्या विरोधात भारतभरातील हिंदूंनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रारत करून स्वतःचे धर्मकर्तव्य पार पडणे आवश्यक ! – संपादक)

(सौजन्य : झीन्युज)

यापूर्वी इलियास यांच्याकडून हिंदूंचा अवमान !

इलियास यांनी अशा प्रकारची विधाने यापूर्वी अन्य एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात केली होती. त्यात त्यांनी ‘हिंदूंना मूर्ती आणि गुप्तांग यांची पूजा करण्याची सवय आहे. हिंदूंच्या ग्रंथात उल्लेख आहे की, मूर्तींची पूजा करणार्‍यांना नरकात पाठवण्यात येईल. (असे कुठल्या ग्रंथात लिहिले आहे ? हिंदूंमध्ये भ्रम पसरवणार्‍या अशांना हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारणे आवश्यक ! – संपादक) यामुळे हिंदूंनी मूर्ती, लिंग यांची पूजा करू नये. अशा प्रकारची पूजा करणारे बुद्धीहीन, अकलेचे आंधळे आहेत’, असे म्हटले होते. तसेच चर्चासत्रात सहभागी असणार्‍या एका मान्यवराला शिवीही दिली होती. यामुळे त्याला चर्चासत्रातून हाकलून लावले होते.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अशी विधाने करणार्‍यांच्या विरोधात भारत सरकार कधी कारवाई करणार ? अशांवर पोलीस स्वतःहून गुन्हा नोंद करून कारवाई का करत नाहीत ? हिंदूंच्या संघटना याविषयी निष्क्रीय का आहेत ?
  • अशी विधाने करणार्‍या मौलवीविषयी इस्लामी देश गप्प का आहेत ? मुसलमानांच्या धर्माच्या श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर तो चुकीचा आणि तुमच्या धर्मबांधवांनी हिंदूंच्या श्रद्धास्थनांचा अवमान केला, तर तुम्ही मौन बाळगणार ! याविषयी हिंदूंनी आणि भारत सरकारने या देशांना जाब विचारला पाहिजे !